राज्यात १२ हजार ५२८ पोलिसांची पदे भरण्याचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या १६ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात जवळपास साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असून सदरील पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येऊन डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ वर्षात रिक्त झालेले ५२९७ पदे तसेच २०२० वर्षात रिक्त झालेले ६७२६ पदे आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकूण ९७५ पदांपैकी पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे भरण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहेत.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे संभाजी राजे भोसले यांनी भरतीला तीव्र आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत  असून राज्यात पोलीस विभागातील भरती करताना मराठा समाजासाठी १३% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

 

संबंधित बातमी पाहा

 

मा. संभाजी राजे भोसले यांचा आक्षेप…

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

27 Comments
  1. Vishal vilas kandanwar says

    Superb

  2. Sagar Khandare says

    super

  3. Chandrakant Sakhare says

    Nice

  4. Abhishek surwase says

    I am happy

  5. Nikhil Gade says

    Very good?

  6. SHIVRAJ SANJAY PHULMOGARE says

    आधी जे फ्रॉम भरलेली आहे, त्याचे पेपर घ्या.

  7. Shital lulekar says

    Nice

  8. raj jadhav says

    very good

  9. जनार्धन आण्णासाहेब ढवळे मु.थिगळखेडा तालुका.भोकरदन जि.जालना says

    आधी जे फॉर्म भरले आहे त्यांचे पेपर घ्या. फॉर्म भरण्यासाठी जी फीस लागली आहे त्यांचा विचार करा साहेब विद्यार्थ्यांना फसू नका गरीब व शेतकऱ्याचे मुले आहे.

  10. Amol says

    Nice

  11. Gokul Laxman Kale says

    Aare no.1 na

  12. विकास आबासाहेब बागडे says

    नाइस

  13. Rahul Jibhe says

    Magil 6 varsha pasun police bharti nahi cha barobar zhali mahnun ya bharti madhe age limit vadhvinyat yavi.

  14. Dnyaneshwar Kalbande says

    अगोदर 2 वेळेस फॉर्म भरले त्याचे काहितरी बघा नंतर ही भरती काढा हे सरकार जनतेकडून लुटतेय बघा ड्यूटीवर असणार्या पुलिस लोकांचे पेमेंट हे वरच्यावरच काढतात

  15. Pandurang Dattarao Tale says

    2019 चे फॉर्म भरले होते त्याच काय आमचे एक वर्ष वाया गेले साहेब आता वय संपलं याला जबाबदार कोण , महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी आहे आम्हाला न्याय द्यावा

  16. ARUN BANSODE says

    YA AGODAR CHYA BHARTICHE JE FORM BHARUN GHETLE TI BHARTI KARA ANI MAG NAVIN BHARTICHA VICHAR KARA FAKT FORM BHARUN NIDHI GOLA KARAYCHA ANI BHARTICHYA NAVAVAR VIDYARTYACHE
    PAISE KHAYCHE

  17. sudhir a. patil says

    aarkshan aarkshan mhanat bhartiche vay nighun jayche

  18. Amol Rathod says

    Very good

  19. भगवान सातपुटे says

    अगोदर जे फोरम भरले आहेत त्याचे पैसे वापस करा

  20. Kiran kadam says

    Very good

  21. Avinash.Ghuge says

    Nice

  22. Anand Ramesh Chavan says

    Very nice

  23. Satish says

    आम्हाला भरती वगैरे काही नाही करायची ही सगळी आंधश्र्धा आहे आमचे घेतलेले पैसे माघारी करा
    ????

  24. Study2Job says

    This Is the great website for getting free study materials
    Please Visit here

  25. Sampat says

    Very nice

  26. Dipak kamble says

    Very nice

  27. Jitesh says

    Very right ??. Friend

Comments are closed.