दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार- वर्षा गायकवाड

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री यांनी केली असून इय्यता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर इय्यता दहावीची परीक्षा दिनांक २९ एप्रिल ते ३१ मे २०१ दरम्यान घेण्यात येणार असून बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असं मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोविड-१९ च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Comments are closed.